MENU

Thursday, October 17, 2019

* इच्छाशक्ती व विचार *



      या  जगात  सर्वात शक्तिमान कोण आहे  ? असा प्रश्न जर  आपल्याला विचारण्यात  आला तर  आपण पटापट  हत्ती , गेंडा  अशी  नावे घेतो. पण  हि नावे  घेताना  आपण  एक गोष्ट विसरतो कि  या जगातील  सर्वशक्तिमान अशी गोष्ट आपल्याजवळ म्हणजेच  माणसाजवळ आहे. ती म्हणजे  आपला  मेंदू.
                मानवी मेंदूची माहिती साठवण क्षमता हि २.५ petabyte  अशी आहे. म्हणजे  १६ gb चे दीड लाख फोन एवढी आहे.  असा हा सर्व शक्तिमान मेंदू आपल्याला लाभला आहे. पण आपल्या जीवनात आपण खरच या मेंदूचा किती वापर करतो , असा प्रश्न कधी आपल्याला पडला आहे का ?
                आपल्या संपूर्ण  जीवनात आपण आपल्या मेंदूचा केवळ  २ % वापर करतो. जर एवढा कमी वापर करून आपण आयुष्यात एवढ्या घडामोडी करत असू तर विचार करा आपण आपला मेंदू पूर्ण क्षमतेने वापरला तर काय होईल.
                भगवत गीता सांगताना श्रीकृष्ण सांगतात कि चित्त स्थिर ठेवा. मग हे चित्त  स्थिर का  ठेवायचे ?  तर चित्त स्थिर असेल तर आपण पूर्ण क्षमतेने काम  करू शकतो. एकदा का आपण आपली  क्षमता ओळखली कि आपल्या आतमध्ये असणाऱ्या शक्तीची आपल्याला जाणीव होते. आणि हि जाणीवच आपल्या आपल्या क्षेत्रात यशस्वी  बनण्यास उपयोगी पडते.
                या जगात विचार करण्याची ताकद फक्त माणसाला मिळाली आहे. पण निरोपयोगी विचार करून हि मिळालेली ताकद आपण वाया तर घालवत नाही ना ?  दररोज  हजारो  विचार आपल्या मनात येतात आणि जातात. त्यात काही सकारात्मक , काही नकारात्मक असतात.
                        जेव्हा नकारात्मक  विचार  आपल्या मनात घर करतात तेव्हा आपल्याला नैराश्य येते. सकारात्मक  विचारांचे जर प्राबल्य आपल्या मनात असेल तर आपण जे  पाहतो , होऊ इच्छितो  ते सगळ याची देही याची डोळा आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यासाठी गरज आहे ती फक्त आपल्या सवयी बदलण्याची.
                तुमची  इच्छाशक्ती  जर प्रबळ असेल  तर  तुम्ही  मृत्यूलाही  वाट पाहायला   लावू  शकता . याचे उदाहरण द्यायचे झाले  तर  स्टीफन  हॉकिंग – वयाच्या २१ व्या वर्षी  मेंदूच्या असाध्य  आजाराने  ग्रासल्यानंतर  डॉक्टरांनी  केवळ  २ – ३ वर्षे जगेल असे सांगितले होते . पण आपल्या  प्रबळ  इच्छाशक्तीने  स्टीफन  त्यानंतर हि ३७  वर्षे जगले. आणि आपले  संशोधन  कार्य करत राहिले.
                आपल्याला  होणारे  आजार , आपल्यावर येणारी संकटे , त्यावर निघणारे मार्ग  हे सगळं  आपल्या विचाराचा परिपाक आहे . सुख ,दुःख या बाबी आपल्या विचारावरच अवलंबून आहेत. तेव्हा आपणच  ठरवायचं  सुखी  राहायचा कि  दु:खी.
       
                         

No comments:

Post a Comment